मुंबई – राज्याचा कारभार अधांतरी चालला असल्याची टीका सध्या भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ही टीका केली जात असून मुख्यमंत्रिपदाचा भार कोणाकडे तरी सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यासाठी आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे असे पर्यायही भाजपाने पुढे केले आहेत. मात्र आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.
नारायण राणेनंतर आता पुत्रालाही होणार अटक? सिंधुदुर्ग, गोवा आणि मुंबईमध्ये पोलिसांची जोरदार तयारी
मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार चालला आहे का? अशावेळी मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? या संदर्भाने प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर प्रथेप्रमाणे बहिष्कार टाकल्याने उद्धव ठाकरे यांचा घराबाहेर पडण्याचा बेत बारगळला होता. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनातील अनुपस्थिती हा मुद्दा विरोधकांनी प्रचंड मोठा केला होता.
“सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा मुद्दा लावून धरला होता. उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांनी गैरहजर असणे स्वाभाविक आहे. त्यांचे आजारपण हे चिंताजनक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार तुर्तास दुसऱ्या कोणाकडे तरी सांभाळायला द्यावा. त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांवर विश्वास नसणे स्वाभाविक आहे. शिवसेनेतील नेत्यांवरही उद्धव ठाकरे यांचा विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवावा. आता उद्धव ठाकरे यांचा स्वत:च्या मुलावरही विश्वास नाही का, असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला; आवाजी मतदान प्रक्रियेवर राज्यपालांचा आक्षेप
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर
- “..तार्तम्य बाळगा, मी कुणाच्या मध्ये नसतो”; पडळकरांप्रकरणी टीका करणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर
- “पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय?”; पडळकरांवरील हल्ला प्रयत्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक
- “…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात