मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना विधानसभाअध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन पत्र देऊन सूचित केलं. मात्र राज्यपालांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतला.
राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
मला राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया तपासायची आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात इतकंच नमूद केलं आहे. किती वेळ हवा आहे किंवा किती काळ लागू शकेल अशी कोणतीच माहिती या पत्रात नसल्याचं समजतंय.
दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र तरीही विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच अद्याप कायम आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण, राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला.
नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे. काल महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.
Read also:
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर
- “..तार्तम्य बाळगा, मी कुणाच्या मध्ये नसतो”; पडळकरांप्रकरणी टीका करणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर
- “पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय?”; पडळकरांवरील हल्ला प्रयत्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक
- “…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
- “नितेश राणे चुकीचेच, पण तुम्ही सुद्धा हुप हुप केले होते..”, भास्कर जाधवांच्या मागणीनंतर फडणवीसांचा संताप