सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष शिगेला पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवणून टाकू असं देखील म्हटलं होतं.
फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
“१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना या संदर्भात तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहेत. ते तीन वेळेस गैरहजर राहिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. हल्ल्यातील मुख्य आरोपी सचिन सातपुतेची चौकशी केल्यानंतर शिवसेनेने भाजप आमदार नीतेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरलीय. त्यामुळे कणकवली पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.
“एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
त्यानंतर सिंधुदूर्ग पोलिस नीतेश राणे यांच्या घरीही गेले. मात्र, तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नीतेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदूर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री असल्याने ते विशेष विमानाने दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथेही फिल्डींग लावल्याची माहीती मिळतेय. आज मुंबईत विधान भवनात भाजप आमदार नीतेश राणे उपस्थित राहीले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नीतेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
Read also:
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ