मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सरकारने निर्णायक पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही संप मागे घेण्यात आलेला नाही. परिवहनमंत्री अनिल परब यांनी अनेकदा कर्मचारी संघटनांशी चर्चा करूनही संप फुटेनासा झाला आहे.
“सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
मागील एकही दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कनिष्ठ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि अनिल परब यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर संप माघारी घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. असं असतानाही अजूनही कर्मचारी कामावर न परतल्याने सर्वसामान्य जनतेचा खोळंबा झाला आहे.
“…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाग घेतला होता. मात्र कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे त्यांनी संपातून माघार घेतली होती. सध्या ऍड. गुणरत्न सदावर्ते हे एसटी आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विलगीकरण हेच आमचं अंतिम लक्ष आहे आणि विलगीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय?”; पडळकरांवरील हल्ला प्रयत्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक
आज अधिवेशनात एसटी संपासंदर्भातील चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी, बडतर्फ कामगारांना कामावर परत घेणार का?, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांना केला होता. यावर कामावर पुन्हा रुजू झालेल्यांची कारवाई माघारी घेण्यात आली, मात्र बडतर्फ कामगारांवरची कारवाई मागे घेणार नसल्याचे परबांनी सांगितले.
Read also:
- ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार; विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर महाविकास आघाडी ठाम
- “उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा”
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला; आवाजी मतदान प्रक्रियेवर राज्यपालांचा आक्षेप
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर
- “..तार्तम्य बाळगा, मी कुणाच्या मध्ये नसतो”; पडळकरांप्रकरणी टीका करणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर