कणकवली : संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप असणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तविली जात आहे.
नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
या पार्श्वभूमीवर काहीवेळापूर्वीच नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकलेला नाही. परंतु, कारवाई टाळण्यासाठी कशाप्रकारे बचाव करता येईल, याविषयी फडणवीस यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला असल्याची शक्यता आहे. त्यानुसार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे.
नितेश राणेंना अटक होणार? मंत्री नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया…म्हणाले…
प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर
आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना कारवाईविषयी आश्वस्त केले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस अधीक्षक स्वत: याप्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे आता राणे कुटुंबीय काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.
Read also:
- ” जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करतात”; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर शरद पवारांनी दिले उत्तर
- एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
- ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार; विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर महाविकास आघाडी ठाम
- “उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा”
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला; आवाजी मतदान प्रक्रियेवर राज्यपालांचा आक्षेप