मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायलयीन कोठडी आज संपणार होती. त्यामुळे त्यांची सुटका होऊन त्यांना दिलासा मिळेल, अशी चर्चा सुरु होती. पण न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काव कारावा लागणार आहे. खरंतर निलंबित एपीआय सचिन वाझे याने चांदीवाल आयोगाला चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता. पण तरीही मधल्या काळात देशमुख आणि वाझे यांच्या एकाच खोलीतील तासभर भेटीच्या चर्चांना उधाण आलं होतं. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण अनिल देशमुखांना आता 10 जानेवारीपर्यंत तरी जेलमध्येच राहवं लागणार असल्याचं सध्याचं चित्र आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर
100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला; आवाजी मतदान प्रक्रियेवर राज्यपालांचा आक्षेप
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
Read also:
- देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या कोर्टात फैसला
- ” जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करतात”; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर शरद पवारांनी दिले उत्तर
- एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
- ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार; विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर महाविकास आघाडी ठाम
- “उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा”