मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस हा नुकताच पार पडला आहे. राज्यपाल भगतसिंह कोषारी विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेल्या संघर्षामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही किंबहुना तिला जास्तच उशीर झाला. पहिला दिवस हा विरोधी पक्षाकडून चांगलाच गाजवण्यात आला. आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कलेमुळे विरोधी भारतीय जनता पक्षाने त्यांना माफी मागण्यास लावली.
अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान
दुसऱ्या दिवशी आमदार नितेश राणे यांचे म्याव म्याव प्रकरण चांगलेच गाजले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवरून आतमध्ये प्रवेश करत असताना आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. यावर शिवसेनेकडून आक्रमक भूमिका सभागृहात घेण्यात आली. आमदार भास्कर जाधव, आमदार सुहास कांदे, आमदार सुनील प्रभू यांनी सर्वांनीच नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली होती.
“बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
काल शेवटच्या दिवशी आमदार दिलीप मोहिते यांनीही चांगलीच राजकीय फटकेबाजी सभागृहात केली. स्वर्गीय. गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे दिग्ग्ज नेते होते. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा मुंडे साहेबांनी दिली होती. मात्र राज्यातील भारतीय जनता पक्षाला त्याचा विसर पडला आहे. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवले त्या स्वर्गीय. मुंडेंच्या कन्येला आपण घरी बसवले असा घणाघाती आरोप आमदार दिलीप मोहितेंनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
Read also:
- नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ? कालच्या सत्रात न्यायालायने अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली
- “मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले.
- “मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?
- अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…
- ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी