मुंबई : ईडीचे मालक दिल्लीत बसले आहेत, तेच आहेत, तेही व्यापारी आहेत. मात्र या व्यापारांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जे जमिनीच्या व्यवहाराचे आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या ईडीचे मालक दिल्लीत बसलेत. ते व्यापारीच आहेत. मात्र या व्यापारांना त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू,” अशी टीका संजय राऊत यांनी थेट केंद्रावर केली.
ईडी, सीबीआय, इंटरपोल, सीआय, केजी, युनोकडे जा किंवा इतर कुठेही जा, ते स्वत: भ्रष्टाचारी आहे. त्यांच्या तोंडाला शेणाचा वास येतो आहे, ते दुसऱ्याच्या तोंडाला वास घेत आहेत, असेही ते म्हणाले.
या व्यापारांचे जे एजंट आहेत, तेच ईडी वैगरे सांगत आहे. ईडी काय तुमच्या बापाची नोकर आहेत का? तसं असेल तर सांगा. रोज रोज हे काय धंदे सुरु आहेत, अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.
आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्याची आहे. ज्यांनी त्यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्यांना शिक्षा देण्याची आहे. मात्र शेठजींच्या पक्षातील काही प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. म्हणून ते अशाप्रकारची फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
Read Also :
अर्णब गोस्वामीचा थेट भाजपशी संबंध, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी प्रकरण दाबले…
किरीट सोमय्या यांनी केली मुंबईच्या महापौर आणि ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका याचिका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर
आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले