मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांनतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 13, 2020
“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.
Read Also :
किरीट सोमय्या यांनी केली मुंबईच्या महापौर आणि ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका याचिका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर
आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले