पुणे: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवर्षी देखील आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. यावरती हभप बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावर बराच वादंग निर्माण झालेला. तथापी, मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा पार पडणार आहे. या पूजेला व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप बंडातात्या कराडकर यांनी विरोधी दर्शवला आहे.
हे पण वाचा: …अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
याबाबत बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचा टाळावं. ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्यात आली त्यावरून महाराष्ट्रात भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान सुरू असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलीस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही.”
हे पण वाचा: पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
संतांचा व भगव्या ध्वजाचा पदोपदी अपमान व अनादर होत असताना आपल्या हातून होत असलेली महापुजा पांडुरंगाला मान्य होणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येण्याचे टाळावे, असे मत जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले… #मामु विचार करा, जे औरंगजेबाला जमलं नाही pic.twitter.com/WWK6i7buFN
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 19, 2021
तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्य ट्विटर अकाऊंटवरून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मी संपूर्ण वारकरी संप्रदायामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती करतो की, पांडुरंगाच्या महापूजेला येण्याची तसदी घेऊ नये, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत बंडातात्या कराडकर?
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
हे पण वाचा: भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असा गनिमी कावा
व्यसनमुक्तीची चळवळ
हभप बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या २० वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहीत व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. १९९७ पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.
हे पण वाचा: मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?
वारकरी शिक्षण देणारी पहिली शाळा
व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.