मुंबई: सदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. ८ व्या मिनिटाला विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यावरून मोदींनी विरोधकांना टोमणा मारला – काही लोकांना महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही त्यामुळे गोंधळ घालत आहेत.
हे पण वाचा: …अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बहुसंख्य महिला आणि मागास नेते मंत्री झाले आहेत. मोदी म्हणालेत की ” मोठ्या संख्येत महिला, दलित, आदिवासी, शेतकरी कुटुंबातील खासदार आता मंत्री झाल्याने आज सभागृहात उत्साहाचे वातावरण असेल, मला वाटले होते. त्यांचा परिचय करुन देणे आनंदाचे होते, मात्र काहींना दलित, महिला, ओबीसी, शेतकरी पुत्र मंत्री झालेले रुचले नाही. त्यामुळे त्यांनी परिचय करू दिला नाही.”
हे पण वाचा: मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?
हे अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले होते. त्यांना विरोधकांनी बोलू दिले नाही.
हे पण वाचा: अंतर्गत राजकारणामुळेच संजय धोत्रेंचा राजकीय बळी; राजकीय चर्चेला उधान
या अधिवेशनात २ आर्थिक विधेयकांसह एकूण ३१ विधेयके मांडली जाणार आहेत. काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी लोकसभेत कृषी कायद्यांविरोधात स्थगन प्रस्ताव देणार आहेत. शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेससह विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे.