मुंबई : दरवर्षी येणाऱ्या मान्सूनच्या पावसात, मुंबईची होणारी तुंबई, ही काही नवीन घटना नाही. मात्र, दरवर्षी यामुळे दरड कोसळून, मॅनहोलमध्ये पडून, पावसाळामुळे वाहून जाऊन-बुडून अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, यातून ना महापालिका काही बोध घेताना दिसत आहे, ना नागरिक. त्यामुळे, मुंबईच्या होणाऱ्या तुंबईला आणि त्यामुळे घडणाऱ्या घटनांमध्ये जे जीव जातात, त्याला जबाबदार कोण? नागरिक की महापालिका? हा अनुत्तरित सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; देशमुखांच्या समर्थकांकडून ईडी कारवाईचा निषेध
काल रात्री मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा एकदा झोडपून काढलंय. यामुळे अनेक ठिकणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आणि या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकाच दिवसात तब्ब्ल ३० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काल मुंबईत रा. ११- प.३ यादरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळला आणि प्रचंड पाऊस, तसेच पाण्याच्या रेट्यामुळे दरड खचली, संरक्षक भिंती कोसळल्या. चेंबूर आणि विक्रोळीतील दुर्घटना यामुळेच घडल्याचे सांगितले गेले आहे.
…अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरू ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
मात्र, यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचे ढग दाटले आहेत…
- पावसामुळे घडत असलेल्या या घटनांच्या परिणामांची जबाबदारी कुणाची? तसेच या घटना घडू नयेत याचीही जबाबदारी कुणाची?
- जागा कमी आणि लोकसंख्य जास्त असल्याने, मुंबईतील जागेची अडचण ही एक मोठी समस्या आहे, ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका काय करत आहे?
- मुंबई आणि उपनगरांमधील टेकड्यांच्या आणि छोट्या-मोठ्या डोंगरांच्या, निसरड्या डोंगरउतारांवर हजारो कुटुंबे झोपडपट्ट्यांत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांच्या राहण्याचा प्रश्न महापालिका का सोडवत नाहीये?
- या झोपडपट्ट्या उभ्या राहणे, हाच मुळात महापालिकेच्या गैरकारभाराचा आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम नाही का? तसेच याला नागरिकही जबाबदार नाहीत का?
- मुंबई शहराला स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत, अजून किती भार हे शहर पेलवणार आहे? याकडे कोण लक्ष देणारा? आधीच जागेची कमतरता आणि त्यात रोज येणारे मानवी लोंढे, हे थांबवणे किंवा त्यादृटीने स्वतःहून काही पावले उचलणे ही जबाबदरी कुणाची?
- निसर्गाचा लहरीपणा हे उत्तर ग्राह्य धरले तरी याला जबाबदार कोण? याचे उत्तर काय?
- मागील ३ दिवसांपासून मुंबईत तब्बल ७५० मि.मी. एवढा तुफान पाऊस झाला असून, कालच्या एका दिवसात ज्या ११ दुर्घटना घडल्या आणि ३० जीव गेले, त्या दिवशी तब्बल २३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका पावसाच्या पाण्याचा निचरा व्यस्थितपणे होण्यासाठी काही उपायोजना करत तरी आहे का? कि पावसाआधी नालेसफाई हा केवळ एक दिखावा असतो?
मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
दरम्यान, पुढील ३-४ तासांत काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून, पावसामुळे सखल भागातील रस्ते , रेल्वे मार्ग, प्रभावित होऊ शकतात. तसेच, हवामान विभागाने, मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून, ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज सांगितलं आहे.
तरीही सामना मध्ये हेडलाईन येईल “आमचीच लाल आमचीच लाल”
मुंबईत १७ जुलैच्या सकाळपासून ते १८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सांताक्रुझमध्ये २१७.५ मि.मी., कुलाबा १७८ मि.मी., महालक्ष्मी १५४.४ मि.मी., बांद्रा २०२ मि.मी., जुहू विमानतळ १९७.५ मि.मी., राम मंदिर १७१.५ मि.मी., मिरा रोड २०४ मि.मी., दहिसर २४९.५ मि.मी. आणि भायंदरला १७४.५ मि.मी. पाऊस झाला आहे.
Read Also :
- “लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”
- तीन-चार खासदार असणाऱ्यांचा सल्ला कोण घेईल? पवार-मोदी भेटीवर सदाभाऊ खोतांचा खोचक टोला
- मोठी बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल
- “काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याची आठवण करून दिलेली बरी”; शिवसेना-राष्ट्रवादीच्या रस्सीखेचात काँग्रेसची एन्ट्री
- राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील