मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षण, इडी-सीबीआयच्या चौकशा, भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षांसाठी केलेले निलंबन, तसेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न, फोन टॅपिंग प्रकरण, एमपीएससी भरती प्रक्रिया आणि परीक्षा, कंत्राटी परिचारिका, अंगणवाडी सेविका वेतन अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने-सामने येत आहेत आणि यावरून सत्तेतील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.
…अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
दरम्यान ठाकरे सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांना रोखण्याची, एक नामी शक्कल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोधली असून, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्याची अंमलबजावणी होईल, अशा प्रकारे तिची रचना त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गनिमी काव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मध्यंतरी पंतप्रधानांनी, महामारी तीव्र असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक घेतली.
मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
या बैठकीत त्यांनी महामारी टाळण्यासाठी, राजकीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरच एक धोरण आखण्याचा आग्रह पंतप्रधानांकडे धरला आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली. मात्र, यामुळे महामारी काळात आंदोलन-मोर्चे आणि मेळावे बैठका यांचा सपाटा लावलेल्या विरोधी पक्षावर आपोआपच नियंत्रण येणार असून, अगदी बारीक-सारीक प्रश्नांमध्ये सरकारला अडचणीत आणून, जनतेसमोर उघडे पाडण्याऱ्या विरोधी पक्षाची बोलती बंद होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
Read Also :
- मुख्यमंत्री आज पंढरपूरकडे रवाना होणार, २० जुलै रोजी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
- मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?
- अंतर्गत राजकारणामुळेच संजय धोत्रेंचा राजकीय बळी; राजकीय चर्चेला उधान
- ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; देशमुखांच्या समर्थकांकडून ईडी कारवाईचा निषेध