जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता माजी मंत्री भाजपचे तारणहार गिरीश महाजन यांना मोठा धक्का दिला आहे. जामनेर तालूक्यातील जवळपास २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यापासून उत्तर महाराष्ट्रात अनेक भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते, खडसे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. आता या पक्षांतराने माजी मंत्री गिरीश महाजनांना मोठा धक्का बसल्याच मानलं जात आहे. पक्षप्रवेश केलेल्या लोकांसोबत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी ट्विटरवर फोटो शेयर केले आहेत.
जामनेर तालुक्यातील नेरी बु, आणी देवपिंप्री येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी आज माझ्या उपस्थितीत #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षात केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या. @PawarSpeaks @NCPspeaks @Jayant_R_Patil pic.twitter.com/mabO8wasAO
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 3, 2020
आता ईथून पुढे उत्तर महाराष्ट्रात फक्त ‘राष्ट्रवादी’चीच हवा असणार आणि माझी ताकद काय आहे आता मी या भाजपला दाखवतोच, अशी गर्जना करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. खूप लवकर आता भाजपमधील मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
जळगांव जिल्ह्यातील भाजपच्या जवळपास 60 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते. आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात आणखी ईनकमींग वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तात्कालीन सरकारमध्ये एकनाथ खडसे यांना बाजूला करण्यासाठी जामनेरचे आमदार गिरीश महाजनांना बळ देऊन त्यांना भाजपमधील मोठा नेता बनवण्याण आले. त्यामुळे जिल्ह्यात एकाच पक्षात दोन वेगवेगळ्या शक्ती निर्माण झाल्या. आता बर्याच काळाने जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे-महाजन यांच्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also :
देवाने कोकणाला अशा मूर्खांपासून वाचवावे, नितेश राणेंची खासदार विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका
मुंबई मेट्रो प्रकल्पात केंद्र सरकार खोडा घालत आहे: संजय राऊत
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका