मुंबई : महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे अलीकडेच कोकणच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध विषयांची माहिती देण्यासाठी त्यांची पत्रकार परिषदही झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
दोन्ही नेत्यांनी यावेळी मास्क घातले होते. मात्र, पत्रकार परिषद सुरू असतानाच विनायक राऊत यांना शिंक आली. हे लक्षात येताच त्यांनी तोंडावरचा मास्क काढला आणि हात तोंडापुढं नेऊन ते शिंकले. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग सध्या बराच व्हायरल होतो आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हे मास्क अर्धवट घालू नये. नाकावर नीट घ्यायला हवं, अशी जनजागृती देखील विविध माध्यमांतून केली जात आहे.
मात्र, शिंक आली असताना खासदार राऊत यांनी हे मास्क काढल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट करून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
नीतेश यांनी त्या प्रसंगाचा व्हिडिओच ट्वीट केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘हे आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार. त्यांनी मास्क का घातलाय असा प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे. अशा मूर्खांपासून देवाने कोकणाला वाचवावे.’ नीतेश राणे यांनी ही संधी साधून विनायक राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
This is Ratnagiri Sindhdurg MP!
He shud he asked why is he wearing that mask?
God save my Kokan from such fools🙏🏻 pic.twitter.com/4cb77lFVrH— nitesh rane (@NiteshNRane) November 2, 2020
दरम्यान आज राज्य सरकारचा किल्ला ठामपणे लढवणारे खासदार संजय राऊत यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. केंद्र सरकार यात खोडा घालत असल्याचा आरोप होत असताना राऊत यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते. राऊत म्हणाले, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील.
राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते आशिष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यावर विचारलं असतानाही त्यांनी विषयाला बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
मेट्रो कारशेडवरुन आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार रंगणार वाद
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार- मंत्री प्राजक्त तनपूरे
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका