मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापली तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र देखील सुरू केले आहेत. यातच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे दोन वरिष्ठ यांच्यात तब्बल सात तास खलबते सुरू होते. बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले.
हेही वाचा…कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची टिका, अजित पवार भेट, शरद पवारांनी मांडली आपली भूमिका
संघाचे मुंबईत येथील कार्यालय असलेल्या यशवंत भवनात मंगळवारी रात्री चार तास आणि बुधवारी सकाळी तीन तास या बैठका झाल्या. या बैठकीत संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, तसेच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या बैठकांमध्ये फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा कलेल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…कॅगकडून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील हे ७ घोटाळे उघड”
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप व संघ, तसेच संघ परिवारातील संघटनांमध्ये कसा समन्वय राखायचा, या दृष्टीने एक आराखडा या बैठकीत चर्चिला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्य सरकार आणि राज्यातील पक्षसंघटेची कामगिर याचा आढावा यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीला सात महिने शिल्लक असताना सरकारने अधिका लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, तीन पक्षांच्या राजकीय विश्वासार्हता निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला