मुंबई : भारताचा पारंपरिक शत्रू ‘पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो’ अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे. भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे म्हणूनच परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे.
पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तान पेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे.
तेथे आजही आंदोलन सुरू आहे. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली . याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरवात केली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे.
म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात काँग्रेसने एल्गार केला आहे.
Read Also :
लपून उत्तर काय उत्तर देता? चर्चेला कुठेही बोलवा, मी तयार, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात अमरावतीत काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात