मुंबई : केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सीमाप्रश्नावरही आपलं मत व्यक्त केलं.
अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सतत आरोप केलं जात आहे. त्यांच्या घरावर पाच छापे मारुन काय साद्य केलं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस आधिकारी आता आहेत कुठं? असा सवालही यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी लखीमपूर येथील घडलेल्या गोष्टीवरही प्रकाश टाकला. शांततेत रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधीचं घडलं नव्हतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर मौन बाळगलं, साधे दु:खही व्यक्त केलं नाही. याप्रकरणी सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं गरजेचं होतं, अशी खंतही शरद पवार यांनी बोलूण दाखवली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ला झाला. यामध्ये एका पाच जवानांना वीरमरण आलं. चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या. पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. सीमेवरील सद्यास्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे, असे शरद पवार म्हणाले. मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणावरही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्त्युतर दिलं. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिसच जबाबदार आहेत. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं, असे शरद पवार म्हणाले.
Read Also :
- फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या – चंद्रकांत पाटील
- भाजपमध्ये मस्त निवांत आहे, चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील
- राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुर्ण क्षमतेने चालू करा; खासदार कोल्हेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर
- जिल्हा परिषद निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या शिवसेनेची पुण्यात मोर्चेबांधणी; संजय राऊतांच्या जोर बैठका
- मिनी विधानसेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; 93 हजार बूथवर महाविकास आघाडीला असा घेरा घालणार