मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी पक्षाच्या कोअर समितीची बैठक मुंबईत पार पडली. पक्षाचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी या बैठकीला उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराला फेसबुक आणि ट्विटरवर स्वतंत्र ओळख द्या – आमदार महेश लांडगे
या बैठकीनंतर शेलार यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या कुकृत्याचा कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा एक पेपर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष एकत्र कसे रचत आहेत, याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू.
रवी राणा यांची आमदारकी धोक्यात, ६ महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश
राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतला. अतिशय नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील 97 हजार 315 बुथपैकी 92 हजार 891 बुथपर्यंतची रचना लागलेली आहे. एक बुथ प्रमुख आणि बरोबर समिती अशी याची संपूर्ण रचना तयार असल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष चांदा ते बांदा काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ईडीची ३ पथकं वाशिममध्ये दाखल
राज्यात सत्तेत असलेले तीन पक्ष हे काही विभागत असलेले पक्ष असुन कोणी पुणे, मुंबई तर कोणी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही पक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापुरते मर्यादित आहेत. आघाडीतील एक पक्षी जिथे आहे तिथे दुसरा नाही. काही ठिकाणी त्यांचे आपापसात मारामारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्णपणे केवळ भारतीय जनता पक्षाच्या बुथ ते विधानसभेपर्यंतची रचना आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचा लेखाजोखा या बैठकीत आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतंय – देवेंद्र फडणवीस
नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आमच्या कल्पने नुसार महाराष्ट्रात एका अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुका होतील. जवळजवळ 274 नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीनंतर एक चिंतन बैठक आमची होईल. आमच्या संपर्कात आजही काही लोक, परिवार, स्थानिक नेतृत्व आहेत. आजच त्याबाबत अधिक बोलता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह आणि पक्षाचे पदाधिकारी यांचे दौरे आणि प्रवास आता सुरू होतील. निवडणूका जिंकण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळजवळ 15 विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर अधिकचे यश मिळेल, याचे राजकीय विश्लेषण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
- देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल; साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू, वाचा काय नेमकं प्रकरण…
- एकनाथ खडसेंना तुर्त दिलासा, पण पत्नीला अटक होणार? न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला
- तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- महापालिकेत भाजपा-मनसेची युती पक्की? कोअर कमिटीच्या बैठकीआधीचं मनसेनेते फडणवीसांच्या भेटीला