मुंबई : निवडणूक शपथपत्रातील गुन्हा लपविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अद्यापही दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात साक्ष आणि पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याविरूद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडपून ठेवली, अशी तक्रार सतीश उके यांनी केली होती. सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला फडणवीस यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळेस उच्च न्यायालयाने उके यांची तक्रार फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला उके यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
पिंपरी चिंचवड शहराला फेसबुक आणि ट्विटरवर स्वतंत्र ओळख द्या – आमदार महेश लांडगे
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया सुरू करून फडणवीस यांना समन्स बजावला. परंतु तीनदा फडणवीस यांनी न्यायालयाला अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली. ती मंजूर झाली होती. मात्र, तक्रारकर्त्याने त्यावर आक्षेप घेतला होता. आता परत याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात साक्षी आणि पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Read Also :
- एकनाथ खडसेंना तुर्त दिलासा, पण पत्नीला अटक होणार? न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला
- तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- महापालिकेत भाजपा-मनसेची युती पक्की? कोअर कमिटीच्या बैठकीआधीचं मनसेनेते फडणवीसांच्या भेटीला
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
- मोठी बातमी: २ ते १८ वर्षांच्या मुलांना लसीकरणासाठी केंद्र सरकारची मंजूरी; कोणती लस मिळणार?