जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमधील भाजपची ताकद कमी झाल्याची चर्चा आहे. खडसेंच्या जाण्यानंतर जळगावात भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. भाजप आमदार गिरीश महाजन देखील सातत्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जळगावात बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मतभेत विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही संधी असल्याचे यावेळी गिरीश महाजन म्हणाले.
मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवून कामाला लागा. पुढे जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे भविष्यात असलेल्या निवडणुकांची रंगीत तालीम करण्याची नामी संधी आपल्याला आली आहे. यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
Read Also :
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती