मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेते 56 आमदारांपैकी फक्त 14 आमदार सोबत असुन एकनाथ शिंदे गटात 41 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक एक आमदार आता शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल होत आहेत. त्यामुळे समाज माध्यांमावर राष्ट्रवादी काॅंग्रेस आता शिवसेनेला दुबळी बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टिका केली आहे. भाजपच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे राज्यात डांबून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे भाजपच्या ताब्यात शिवसेनेचे 17 ते 18 आमदार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोणतीही बैठक घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“शिवसेेनेचे सर्व आमदार शिंदेंसोबत फक्त पैशासाठी गेलेत”; इम्तियाज जलीलांचा नवा आरोप
अशातच आता बंडखोर शिवसेनेचे आमदार भाजपमध्ये विलीन झाला तर सरकार स्थापन करणार असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ? त्यामुळे एकच चर्चा रंगली आहेत.
हिंदुत्वाच्या वनवासात ठाकरे अन् शिंदे राम लक्ष्मण जोडीसारखे, शिवसैनिकांनो रडायचे नाही
दरम्यान, शिवसेनेचे 41 आमदार गुवाहाटी याठिकाणी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आता शिवसेनेचे 4 खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ते खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याची शक्यता आहे, कारण कालच खासदार भावना गवळी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.
Read also:
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” आजच वर्षा बंगला सोडणार ; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा; पवारांचा ठाकरेंना सल्ला, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
- “सेनेच्या बंडखोर आमदारांना सोमय्यांकडे कपडे नेऊन देण्याची जबाबदारी”; राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
- “उद्धव ठाकरेंबद्दल आदर वाढला, नाराज आमदारांना जोरदार चपराक”; इम्तियाज जलील
- “शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका”, बंडखोर आमदारांना ठाकरेंनी ठणकावलं