मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर वर्षा येथे बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवा असा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात ? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
हिंदुत्वाच्या वनवासात ठाकरे अन् शिंदे राम लक्ष्मण जोडीसारखे, शिवसैनिकांनो रडायचे नाही
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बंडखोर आमदारांपैकी एका आमदारांनी जरी सांगितले तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको तर आज मी वर्षावरील मुक्काम मातोश्रीवर हालवत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हिंदुत्वाबाबत विधिमंडळात बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेन. तसेच बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही, असा काही लोकांकडून भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल हिंदु, आज हिंदु आणि उद्या देखील हिंदुच राहणार. सध्याचं राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याबाबत मला काही बोलायचं नाही. तसेच गेल्या काही दिवसात विधान परिषदेची निवडणुक झाली. त्यावेळी काही शिवसैनिक हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा काही आमदार बाहेर गेले तरी त्यांच्यावर शंका घेतली गेली.
सेना अन् शिंदे गटात टोकाचा संघर्ष; एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाचा मुख्यप्रतोद नेताच बदलला
2019 च्या विधान सभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी मला बाजूला घेतलं. आणि सांगितलं की उद्धव साहेब जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार. तसेच शिवसेनेकडून इतर कुणाला दिलं तर ते कठीण आहे. महापालिकेत उमेदवार जिंकल्यानंतर देखील त्यांचं अभिनंदन कऱण्यासाठी जातो. त्यामुळे महाापालिकेत देखील नसणारा नेता मुख्यमंत्री कसा होणार. ? असा सवाल मी त्यांना केला. जिद्द आणि त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. मात्र जे काही सध्या रंडकुंडीचं राजकारण चालू आहे. त्याचं कुणाला उपयोग होत नाही,
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”
शरद पवार यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि माझ्याच लोकांना मुख्यमंत्री मी नको असेल तर पुढे काय करायचं? त्यामुळे त्यांना सुरत किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्याची काय गरज होती? की उद्धवजी तुम्ही कारभार करण्यासाठी नालायक आहेत ? मग त्यांनी माझ्यासमोरच सांगायला काय झालं होतं? जर असं असेल तर त्यांच्यातील एका आमदारांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको आहे. तर आज सांयकाळी माझा वर्षावरील मुक्काम मातोश्रीवर हलवत आहे.
Read also:
- “सेनेच्या बंडखोर आमदारांना सोमय्यांकडे कपडे नेऊन देण्याची जबाबदारी”; राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
- “उद्धव ठाकरेंबद्दल आदर वाढला, नाराज आमदारांना जोरदार चपराक”; इम्तियाज जलील
- “शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका”, बंडखोर आमदारांना ठाकरेंनी ठणकावलं
- “मी कसं काय बंड करेन, तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो”; एकनाथ शिंदें अन् मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद
- “शिवसेेनेचे सर्व आमदार शिंदेंसोबत फक्त पैशासाठी गेलेत”; इम्तियाज जलीलांचा नवा आरोप