मुंबई : राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना आताच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर होत असताना 2021 पासूनचे सर्व राजकीय गुन्हे माफ कऱण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
एकनाथ शिंदे हे आज सांयकाळी राज्यपाल यांची भेट घेऊन आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र देणार होते. मात्र त्याआधीच राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासाचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याने त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली.
भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
अजित पवार आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठक पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की यापुढेही अशीच साथ राहु द्या. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की काय ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत गेल्यास देवेेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. साताऱ्यात भाजपच्या खासदारांकडून पेढे वाटून आनंद साजरा केला जात आहे. तर पुण्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस असे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती होणार का ? त्याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- “ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य