मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडू राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना आता आसाममधील गुवाहाटी याठिकाणी हलवण्यात आले आहे. ते आज सांयकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होती. मात्र त्याआधीच राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता भाजप श्रेष्ठीकडून संख्याबळ तपासणीचे आदेश दिले आहेत.
“संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविका आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता राजकीय हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. आपल्या आमदारांनासह अपक्ष आमदारांना भाजपने सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
त्याआधी भाजपकडून बैठक सत्र सुरू झाल्याने महाविकास आघाडीकडून देखील मोठ्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची बैठक आताच पार पाडली आहे. तसेच आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना देखील एकाच ठिकाणी बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कॉंग्रेच्या आमदारांना देखील अशाच प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय भुंकप आला असुन काही तासांत महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठा गट तयार करून ते सत्ता स्थापन करण्यासाठी ते भाजप जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
- एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
- शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
- 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
- एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?