मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 26 आमदार सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.
एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्विट केलं आहे. त्यात मशिदीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. सरकार येत जाते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. तसेच 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस की वर्षा तला शेवटचा दिवस असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
एकनाथ शिंदे सेनेला भाजपसोबत जाण्याची अट घालण्याची शक्यता आहे. जर शिवसेना भाजपसोबत गेली तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेसोबतच राहण्याची शक्यता आहे. दुसरी अट म्हणजे एकनाथ शिंदे हा स्वत: चा पक्ष काढून भाजपला पाठिंबा देऊ शकतो. मात्र जर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिले तर एकनाथ शिंदे भाजपसोबत जाण्यास तयार होतील. राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा येथे बोलवण्यात आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत दाखल झाले असून काॅंग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत बोलवण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मोठे नेते सुरतमध्ये दाखल होणार आहेत.
“शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येत होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबरोबर बंडखोरी केली असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आज पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात. त्यावर राज्यातील सरकार निर्भर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आता महत्वाची भूमिका राहिली आहे.
Read also:
- एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
- “संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
- “उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
- आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
- एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का