मुंबई : एकनाथ शिंदे यांना वारंवार अपमानाची वागणूक दिल्याने त्यांचा स्वाभिमान जागृत झाल्याने त्यातून त्यांनी बंडखोरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळेच गुदमरलेल्या शिवसैनिक, मंत्री, आमदार यांना त्यागाच्या भूमिकेतून बंड केला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करावं आणि राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ सोडवी अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. ते हिंदुत्वाची भूमिका यामधून कबूल करतात. मुख्यमंत्री पदासाठी तडतोड झाली हेही त्यांनी सांगितली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार गेल्याने सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील नारायण राणे यांनी केली आहे.
“बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
एकनाथ शिंदे यांनी योग्यवेळी निर्णय घेतला नाहीतर आनंद दिघे यांच्याबाबत घड़लं ते देखील तुमच्यासोबत घडलं असतं. त्यामुळे प्रसंग घडण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. सरकार आता अस्तित्वात राहिलं नसून महाराष्ट्रासाठी हे चांगल्यासाठी झालं आहे. अडीच वर्षात कोणताही विकास झाला नसल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत काहीही बोलतील, त्यांचा आता आवाज खाली बसला आहे. शिवसेनेमध्ये संजय राऊतांना कोणी घाबरत नाही. शिवसेनेकडे कोणीही आमदार नसल्याचा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येऊ शकतात. त्यामुळे वेळ आली तर भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत पाठवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून भाजपकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also:
- आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
- एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
- एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
- राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
- “शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य