मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडू राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना आता आसाममधील गुवाहाटी याठिकाणी हलवण्यात आले आहे. ते आज सांयकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होती. मात्र त्याआधीच राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.
आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
एकनाथ शिंदे हे आज बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत दाखल होणार होते. मात्र त्याआधीच राज्यपालांची तब्बेत अचानक बिघाडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना राजभवानातून रूग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता सांयकाळीच मुंबईत येण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा कारभार आता गोव्याचे राज्यपालांकडे सोपवण्यात आला असल्याची बातम्या समोर येत होत्या. मात्र राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याने ते व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे ते उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे हे लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वत: ला जवळ 40 आमदार असल्याचा त्यांना दावा केला आहे. त्यांनी भाजपसोबत सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला असून एकनाथ शिंदे आता भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचसोबत राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने राजभवानातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून राजभवन पुर्ण कोरोनाटाईन करण्यात आलं आहे.
Read also:
- शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
- 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
- एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
- “संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
- “उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी