मुंबई : शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी दिलेला जोरदार झटका हा पाचवेळा ठरला आहे. याआधी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोध बंडखोरी केली आहे. तरीदेखील शिवसेना यामधून सावरली, उभी राहिली, मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेचे 56 आमदारांपैकी तब्बल 36 आमदार फोडल्याने शिवसेनेला मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये नागरपुरच्या हिवाळी अधिवशेनात 11 आमदारांसह शिवसेना सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते दिल्यामुळे छगन भुजबळांनी बंडाची पताका हाती घेतली होती. त्यानंतर 1999 मध्येच गणेश नाईक यांनी शिवसेनेला रामराम ठोकून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आता भाजपमध्ये आहेत.
एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांच्यानंतर शिवसेनेला नारायण राणे यांनी खिंडार पाडली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राणे यांना डावलून शिवसेनेची सर्व सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्याने त्यांनी जुलै 2005 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेने विरोधात 11 आमदार सर्मथकांनी बंड पुकारला होता.
राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
त्यानंतर राज ठाकरे यांनी राजकारणाच्या महत्वाकांक्षेच्या संघर्षातून बंड पुुकारला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी आमदार बाळा नांदगावकर व इतर काही समर्थकांची साथ त्यांना मिळाली आणि आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना या आधी चार वेळा फुटली,परंतु ती पुन्हा नव्याने उभी राहिली. मात्र एकनाथ शिंदे यांनी तब्बल 36 आमदार फोडले असून हा दावा खरं ठरला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना येण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त एक गट राहणार आहे.
Read also:
- 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
- एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
- “संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
- “उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
- आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल