मुंबई : एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप आला आहे. शिवसेनेच्या काही आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. तर भाजपकडून संख्याबळाची तपासणी सुरू झाली असून सत्ता स्थापन करण्याचा दावा आता भाजप करण्याची शक्यता आहे. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटवरून पर्यावरण मंत्री हे नाव हटवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असल्याचं संकेत आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आल्याने भाजपकडून आता आमदारांची संख्याबळांची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी सागर बंगल्यावर सगळ्या आमदारांना बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सागर बंगल्यावर भाजपसह काही अपक्ष आमदार देखील दाखल झाले असून लवकरच भाजप सरकार स्थापन कऱण्याचा दावा करणार आहे.
आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा कारभार आता गोव्याचे राज्यपालांकडे सोपवण्यात आला असल्याची बातम्या समोर येत होत्या. मात्र राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याने ते व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे ते उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे हे लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वत: ला जवळ 40 आमदार असल्याचा त्यांना दावा केला आहे. त्यांनी भाजपसोबत सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला असून एकनाथ शिंदे आता भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचसोबत राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने राजभवानातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून राजभवन पुर्ण कोरोनाटाईन करण्यात आलं आहे.
https://twitter.com/AUThackeray?s=20&t=Z-2uxSkclryTeIlnzqVZeQ
Read also:
- एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
- शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
- 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
- एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
- “संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा