मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सेनेच्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे पहिल्यांदा सुरतला गेले आणि त्यानंतर ते आता आसामची राजधानी गुवाहाटी याठिकाणी आहेत. अपक्ष आमदारांसह एकुण 47 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर राजकीय पक्षांतील नेत्यांनी शिवसेना खासकरून संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. भाजप आणि मनसेतील काही नेत्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे 11 ते 12 आमदार आता शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरे यांचं काम नाही. त्यामुळे त्यांनी आता आयपीएल साठी तयारी करावी मातोश्री 11 बनवा असं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
एकनाथ शिंदे यांनी योग्यवेळी निर्णय घेतला नाहीतर आनंद दिघे यांच्याबाबत घड़लं ते देखील तुमच्यासोबत घडलं असतं. त्यामुळे प्रसंग घडण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. सरकार आता अस्तित्वात राहिलं नसून महाराष्ट्रासाठी हे चांगल्यासाठी झालं आहे. अडीच वर्षात कोणताही विकास झाला नसल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत काहीही बोलतील, त्यांचा आता आवाज खाली बसला आहे. उद्या बंद होणार शिवसेनेमध्ये संजय राऊतांना कोणी घाबरत नाही. शिवसेनेकडे कोणीही आमदार नसल्याचा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे.
आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येऊ शकतात. त्यामुळे वेळ आली तर भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत पाठवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून भाजपकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also:
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य