मुंबई : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित सामाजिक इतर घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
आमदारांचे असंवैधानिक निलंबन: सर्वोच्च न्यायालयाची महाविकास आघाडी सरकारला चपराक!
हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तर थेट याबाबत मोठा खुलासा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची एका वाईन व्यवसायिकासोबत भागीदारी आहे असा आरोप सोमैया यांनी केला होता. आता भाजप शिवसेनेच्या होणाऱ्या या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
गोव्यात फडणवीस-लांडगेंचा धडाका; म्हापश्यातील शक्ती केंद्रांच्या बैठकांवर जोर
संदीप देशपांडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जेव्हा कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र अडकला होता, तेव्हा मनसेप्रमुख राज साहेब ठाकरे यांनी सरकारला एक सल्ला दिला होता. राज ठाकरे त्यावेळी सरकारला म्हणाले होते की वाईन शॉप चालू ठेवा. त्यावर संजय राऊत यांनी सामनातून राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या "संजय" ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
शराब, शबाब, वाईन, राजबाबू अशा आशयाचं काही तरी लिहून राज ठाकरे यांच्या सल्ल्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला होता. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
Read also:
- म्हापश्यातील कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही – वायंगणकर
- नितेश राणेंचे स्वीय सहाय्य्क राकेश परब पोलीस ठाण्यात हजर; राणेंना जेल की बेल?
- भाजपच्या नेत्यांची मुले काय चणे-शेंगदाणे, ढोकळा विकतात का? संजय राऊतांचा सवाल
- …तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गांज्या निर्मितीची परवानगी द्या – खासदार प्रताप चिखलीकर
- निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे; जातीची अट नाही