मुंबई : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित सामाजिक इतर घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
‘जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील’
हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. आता भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील हा मुद्दा पकडून सरकारला धारेवर धरले आहे.
मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणासारखी होती – फडणवीस
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला भीक लागली आहे. त्यामुळेच सरकारचे उत्पन्न वाढावे या हेतूने नावाखाली माॅल, किराणा दुकानातून वाईन विकण्याची परवानगी यांनी दिली आहे. किराणा दुकानातून वाईन विक्री करणे हा निर्णय महाराष्ट्राचं वाटोळ करणारा आहे. जर तुम्ही वाईन विक्रीला सर्रासपणे विकण्याची मुभा देता तर तुमचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाने मध्यंतरी जो हर्बल तंबाखूचा व्यवहार मध्ये केला, थोडक्यात काय तर गांजाचा तर मग शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
ज्या उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कलंगुटमध्ये आहे अशा उमेदवाराला निवडून देणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारवर सडकून टीका केली आहे. एवढेच नाही तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा संबंध थेट वाईन निर्मिती कंपनीशीच लावला. संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची व्यावसायिक बांधिलकी या निर्णयाशी आहे असा आरोपही किरीट सोमय्या यांनी काल केला होता. त्यानंतर आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गांजाच्या शेतीला परवानगी मागत सरकारला धारेवर धरले आहे.
Read also:
- निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे; जातीची अट नाही
- गोव्यात फडणवीस-लांडगेंचा धडाका; म्हापश्यातील शक्ती केंद्रांच्या बैठकांवर जोर
- आमदारांचे असंवैधानिक निलंबन: सर्वोच्च न्यायालयाची महाविकास आघाडी सरकारला चपराक!
- राज्यातील विरोधी पक्ष देशी पिउन बरळतोय; वाईन विक्री निर्णयावरून संजय राऊतांची भाजपवर टीका
- शास्तीकराचा गुंता राष्ट्रवादीने वाढवाला अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या जखमेवर आता मीठ चोळले?