मुंबई : सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, मुंबई महापालिकेवर भाजपाते नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. तसेच यावेळी महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे..
मुंबई पहिल्याच पावसात तुंबल्याने भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभावर व नाकारते पणा हा पहिल्याच पावसात समोर आला आहे, असे ट्टिवट करत शेलार म्हणाले. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाईचे आकडे पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे.
डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात
पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…
आणि मलाईच्या गोण्या मात्र
कंत्राटदारांच्या खिशात!आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!#MumbaiRainBMCFail pic.twitter.com/xcHpfL5t2h
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 9, 2021
मुंबई तुंबली नागरिकांचे हाल?
दरम्यान, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले होते. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.
Read Also :
- विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं
- काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपात प्रवेश करणार
- शेतकऱ्यांच्या नावावर केंद्र सरकार पेट्रोल- डिझेलमध्ये लूट करतंय – नाना पटोले
- खरे कोण, खोटे कोण? हे सिद्ध झाले; शिवसेनेकडून एकच जल्लोष
- ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात….