पुणे: आतापर्यंत आम्ही असंख्य आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला येऊन काय मिळणार आहे. आमच्याकडे ईडी आल्यास त्यांना आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार”. “ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक,” असल्याचं भाजप नेते गिरीश बापट यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे, गिरीष बापट यांना जरा जास्तच उत्साहीपणा येत असल्याचे बोलले आहे.
करोना महामारीमुळे संपूर्ण बाजार पेठ ठप्प झाली असून त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिन्याभरापूर्वी एक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापही कोणाच्याही खात्यात ती रक्कम जमा न झाल्याने आज आम्ही आरटीओ कार्यालयाच्या पायर्यांअवर मूक आंदोलन करीत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी देखील गिरीश बापटांनी केली.
या आंदोलनात भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला की, बापटसाहेब, तुमच्यामागे ईडी बसला आहे. हे ऐकताच गिरीश बापट यांनी प्रत्युत्तर दिले आणि म्हणाले, “अशा ईडीफिडीना मी काय घाबरत नाही. आजवर असंख्य आंदोलने केली आहेत. आमच्याकडे ईडीला येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार. त्यामुळे मी या ईडीफिडीला घाबरत नाही, असा अती उत्साहीपणा गिरीष बापट यांनी दाखवल्याचे चित्र आहे.
काही रिक्षाचालकांच्या घरी वैद्यकीय अडचणीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे. राज्य सरकारकडून महिनाभरापूर्वी एक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, कोणाच्याही खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. आम्ही RTO कार्यालयाच्या पायर्यांरवर मूक आंदोलन करत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी.” अशी मागणीदेखील बापट यांनी केली.