जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आदित्य ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणांमधून शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार म्हणून करत आहेत. यातच आता शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे कजगाव – तरवाडे – टेकवाडे – पारोळा या चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी भाजप खासदार उन्मेष पाटील, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आमदार किशोर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
“भट्टीतील कोळसा सावंतांनी कुंभकर्णी झोपेत असलेल्या स्वत: च्या नेतृत्वाला जागे करण्याची गरज”
शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील कजगाव-तरवाडे-टेकवाडे-पारोळा या चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. पाच वर्षापुर्वी याच पाचोरा शहरात आदित्य ठाकरे आले होते. मात्र त्यावेळचं चित्र व आत्ताच चित्र बदललेले होते. हा विकास या अडीच वर्षामध्ये झाला व तो फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला असं किशोर पाटील म्हणाले.
“जसा भाजीपाला विकत घेतला जातो, तसा भाजप आमदार विकत घेताहेत”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, केवळ टिका करणे म्हणजे राजकारण होत नाही. आदित्य ठाकरे यांची मला किव येते. सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचं ऑफिसही बघू शकलो नाही. हे माझं दुर्भाग्य आहे. आणि ते काय सांगतील की काय केलं पाहिजे अन् कसला ठुल्लू असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न देखील पाटलांनी केला. मुळातच मी मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालेलो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो असं देखील ते म्हणाले.
Read also
- “शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल
- “प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे
- “तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल
- “तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
- वरळीत घेरण्याचा भाजपचा प्रयत्न, आदित्य ठाकरे म्हणाले, “फुटबॉलच्या मैदानात नेहमी रोनाल्डाच घेरण्याचा प्रयत्न केला जातो”