मुंबई : भाजपमध्ये जे काही मंत्री आहेत ते दुसऱ्या पक्षातून आयत केलेले मंत्री आहेत. त्यांच्या पक्षात काहीही नाही. बंडखोरांना जमा करून ते राज्याच्या सत्तेत आले. पंरतु त्याचा परिणाम पुढच्या काळात नक्की दिसेल. देशासाठी लढणारा काॅंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून ज्या पद्धतीने केला जात आहे. त्याचा काहीही परिणाम भारत जोडो यात्रेवर होणार नसल्याचं मत काॅंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी केलं आहे.
शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
जसा भाजीपाला विकत घेतला जातो, तशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करून आमदार विकत घेण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत आहेत. एकीकडे भ्रष्टाचारविरोधी धोरणाच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे दुसऱ्या पक्षातील आमदार विकत घ्यायचे ही देशाची जनता मुळीच खपवून घेणार नाहीत. असा हल्लाबोल देखील त्यांनी भाजपवर केला आहे.
“आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
देश विकून देश चालवता येत नाही. आई-वडिलांनी कमावलेली प्रॉपर्टी मुलाने विकावी आणि मी घर चालवतोय असं म्हणून स्वत: ची पाठ थोपटता येत नाही. देशाला मोठं करण्याचं काम काॅंग्रेसने केलं परंतु, भाजपचा हा देश विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी टिका देखील नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. त्याचबरोबर इडी सरकारने लोकांसाठी काम करण्यास सुरूवात केलेली नाही. त्यांच्या अनेक मंत्र्यांना मनपंसत खाते न मिळाल्यामुळे ते मंत्रालयात देखील जात नाहीत. फक्त मलाई खाण्यासाठी एकत्रित आलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या चौकडीचा अंदाज लोकांना यायला लागलेला आहे. अशी टिका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
दरम्यान, काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा 150 दिवसांचा भारत जोडो अभियान सुरू केलं आहे. या अभियानात ते एकूण 3570 दिवसांचा प्रवास 150 दिवसात करणार आहेत. तसेच या अभियानात जवळपास 350 लोकांनी सहभाग घेतला असून यामध्ये काॅंग्रेसच्या काही नेत्यांचा देखील सहभाग आहे.
Read also
- “नवनीत राणा ह्या भाजप अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंधभक्त”
- विजयादशमीला सेनेचे 10 नेते शिंदे गटात करणार सीमोल्लंघन..! खासदार, आमदार अन् माजी नगरसेवकांचा समावेश
- “मुंबईत, पुण्यात तसेच महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार”; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
- एकनाथ शिंदे नाना पाटेकरांच्या भेटीला..! म्हणाले, “नानांना भेटून आनंद झाला”
- संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला