अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अनेक शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, जिल्हाप्रमुख कार्यकर्ते शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. यातच आता अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अमरावतीमध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
राजेश वानखेडे यांनी शिवसेनेला रामराम केला पंरतु ते शिंदे गटात सामील होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आज नागपुरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजेश वानखेडे आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. एक कट्टर शिवसैनिक आणि मातोश्रीशीं एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता म्हणून वानखेडे मानला जात होता. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
यातच शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याचं समजत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा सेना नेत्यांनी शिंदे गटात जाण्याचा मार्ग निवडला आहे. याची कल्पना उद्धव ठाकरे यांना असून त्यांची लवकरच लवकर पक्षातून हाकालपट्टी करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
“राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या फुटीरतामुळे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे आता मातोश्रींवर राहिलेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधत आहेत. तसेच आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्रभर दौरे करीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यातच आता शिवसेना आणि निवडणुक चिन्हांवरील लढाई देखील सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे यांना अजून किती धक्के बसणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “मुंबईत, पुण्यात तसेच महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार”; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
- एकनाथ शिंदे नाना पाटेकरांच्या भेटीला..! म्हणाले, “नानांना भेटून आनंद झाला”
- संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला
- शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
- “आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे