मुंबई : मनसे आणि शिंदे सेना एकत्र येतीलही शेवटी आता असं आहे की राज ठाकरे पुर्वी जे होते तसे राहिलेले नाहीत. खरे राज ठाकरे आम्ही त्यावेळी पाहिले होते. पण आता राज ठाकरेंमध्ये लढाऊबाणा राहिलेला नाही. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. तसेच भाजपला काहीही करा पण सत्ता हवी हेच त्यांचं धोरण झालं आहे अशी टीका त्यांनी भाजपवर देखील केली. त्याला आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला हाणला आहे.
“बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
गजानन काळे म्हणाले की, आटा किलोमध्ये की लिटरमध्ये हे माहित नसलेल्या राहुल बाबांचं प्रबोधन करण्याऐवजी बाळासाहेब थोरात राज ठाकरे यांना सल्ले देत सुटले आहेत. काॅंग्रेसच्या तंबू मधून जुने जाणते राहुल बाबांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्ष सोडत आहेत. सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
तारिख पे तारिख..! शिंदे गटाची कोर्टोत आता नवी मागणी, सुनावणी आणखी पुढं ढकलली
काही करा पण सत्ता हवी हेच भाजपाचं धोरण सध्या झालं आहे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. सत्तेकरीता काहीही हेच अमित शाहांच्या भाषणातही दिसून आलं. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यापूढील काळातही सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी आजही एकत्र आहे. भाजपची कार्यप्रणाली लोकशाहीला अनुकुल नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्नशील राहील. आगामी काळात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशी आशा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
“आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं
दरम्यान, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सर्व निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांची देखील भेट भाजपचे नेते घेत असल्याने मनसे देखील भाजपसोबत निवडणुका लढणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Read also
- “राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
- “बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
- अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर
- “आमचे मिशन महाराष्ट्र, त्या मिशन अंतर्गत बारामती आहे;” देवेंद्र फडणवीस
- “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”