मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील लढाई आणखी पुढे ढकण्यात आली आहे. त्यामुळे पुढची सुनावणी आता २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. यातच आता शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेला लागलेली उतरती कळा भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असून ते संपुर्ण महाराष्ट्रा पिंजून काढणार आहे. यावरून भाजप नेते केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
काही प्राणी वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच यांनी हिंदुत्वांच कातडं पांघरले होते. आता ते कातडे फाटून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. सत्ता असताना जे घराबाहेरही पडले नाहीत ते आता महाराष्ट्र पिंजून काढायला निघाले आहेत. त्यांना जनतेच्या असंतोषाला सामारे जाण्याऐवजी पद सोडून पळ काढणारे ठाकरे यांची भाजपला अस्मान दाखवण्याची भाषा म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असाच प्रकार आहे. असा टोला केशव उपाध्यय यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.
“शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
आधी फुटलेले तोंड सुधारा, जमिनीवरून धडपडत तरी नीट उभे राहा, आणि मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा, हे करताना पाठीमागे कोणी आहे की नाही ते तपासून पाहायला विसरू नका. नाहीतर शिल्लक पेंग्विनसेनेचे पळपुटे शिलेदार तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेलेले असतील. त्यांची काळजी घ्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा अमलात आणण्याची हीच ती वेळ आहे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला. अनेक कार्यकर्ते शिवसेनेला सोडून शिंदे गटात जात असताना आता उद्धव ठाकरेंनी बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. तर आदित्य ठाकरे विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातच आता उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्र दौरा आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
Read also
- “निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”
- “मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम;”अजित पवार म्हणाले, कॅमेरा..;
- “बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
- “तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
- “माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे