मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका वाढल्या आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यातच आक्रमक नेते भास्करराव जाधव यांची देखील शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून कामांबाबत इच्छा व्यक्त केली आहे.
“स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
भास्करराव जाधव तुमच्याकडून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण करास, अशी मला खात्री आहे. मी आता हळुहळु टीम वाढतोय. अरविंद सावंत आणि भास्कर जाधवांना आपण नेते केलं आहे. आणखीन नेत्यांचीच नाही, पण सगळ्यांचीच टीम सावकाशपणे मी वाढवणार आहे. भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलं आहे. काऱण आता आपल्याला लढायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
काल ते सांगून गेले की शिवसेनेला जमीन दाखवायची. दाखवा त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. थोडक्यात आता संघर्षाचा काळ आहे. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला असतो. त्याच्यात भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब हे सारे आमदार आहेत. यांनाही ते आमिष दाखवून नेऊ शकले असते. पण तसं झालं नाही. कारण निष्ठा असा विषय आहे की कितीही किंमत लावली तरी विकला जाऊ शकत नाही. पसाभर नासलेले लोक असण्यापेक्षा मुठभर निष्ठावान लोक असतील तर आपण मैदान जिंकू शकतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”