पुणे : भाजपकडून महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमन बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्या आधी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीला कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
“गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
2024 च्या निवडणुकींना अजुन खूप वेळ आहे. तोपर्यंत पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचं काम बोलतंय. त्यांना महासंसदरत्न हा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यामुळे बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात राहव्यात, आर्थिक राजधानीवर आपल्या पक्षाची सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतंय, त्यात भाजपला वाटणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत महत्वाची आहे. मुंबईची जनताच योग्य कौल देईल, असं अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर कोल्हे म्हणाले.
“तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येत आसतात. ही शिवसेनेची खुप जुनी परंपरा आहे. मात्र जो हा वाद सुरू आहे. त्यापेक्षा राज्यात अनेक प्रश्न आहेत. दसरा मेळाव्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचं काम करत आहेत. सक्षम विरोधक असण्याची गरज आहे, असही अमोल कोल्हे म्हणाले.
Read also
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
- “अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….