पुणे : पुण्यातील ससून रूग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हफकिन माणसाकडून औषधं बंद करा असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएने त्यांना हफकीन माणुस नसुन ही एक शासकीय संस्था असल्याचे सांगितले. त्यानंतर मंत्र्यांनी त्या ठिकाणाहुन पळ काढला अशी बातमी छापून आली आहे. छापून आलेल्या बातमीवरून मंत्री सावंत चांगलेच ट्रोल होत आहेत. यावरुन मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
मी मुर्ख आहे का? मी डॉक्टर आहे. मी पीएचडी होल्डर आहे, तसेच रॅकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. मीडिया मुद्दाम टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे. हापकिन कोण आहे हे मला माहित नसल्याचे मिडियाने दाखवले. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडीया माझ्या मागे फिरणार नाही. विशेष म्हणजे अशा गोष्टींसाठी पेनाला टोपण लावत आहेत, असं तानाजी सावंत म्हणाले.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
राज्यात सत्तांतर झाल्याची पोटतिडकी मीडियाला का आहे? जनतेच्या मनातले हे सरकार आणले आहे. हे टाकाऊ सरकार नाही. मिडीयाने टिका करायची आणि आम्ही ऐकायचं असं होणार नाही. यापुढे आमच्या कामातून सडेतोड उत्तर मिळतील. दसरा मेळाव्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा. मी आरोग्य मंत्री झाल्यानंतर झालेला बदल येत्या काही दिवसात तुम्हाला दिसुन येईल, असही मंत्री सावंत म्हणाले.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
सोबतच, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुण्यातील ससून येथील रूग्णालयाला अचानक भेट देऊन डिसाळ कामांवरून डॉक्टारांची चांगली खरडपट्टी काढली. मात्र या दौऱ्यावर त्यांच्यासोबत एक वेगळाच किस्सा घडला. त्यांनी हाफकिन संस्थेला माणूस समजून त्यांना बॅन करण्याचे आदेश दिले. नंतर त्यांच्या पीएने त्यांना हफकीन माणुस नसुन ही एक शासकीय संस्था असल्याचे सांगितले. त्यानंतर मंत्र्यांनी त्या ठिकाणाहुन पळ काढला अशी बातमी छापून आली आहे. छापून आलेल्या बातमीवरून मंत्री सावंत चांगलेच ट्रोल होत आहेत.
Read also
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”