मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे गायब असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. अमित शहा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच मुंबई भाजप शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तसेच त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, परंतु पंकजा मुंडे गायब असल्याने चर्चांना ऊत आला आहे.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
अलिकडच्या काळात पंकजा मुंडे यांना सातत्याने भाजपकडून डावलण्यात आल्याचं चित्र निर्माण केलं गेलं आहे. यावर त्यांनी काहींशी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच मंत्रिपद मिळण्याची इच्छा देखील त्यांनी अधूनमधून व्यक्त केली आहे. तसेच मागील काही दिवसापासून त्या भाजप सोडणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. यातच अमित शहा यांच्या दौऱ्यावर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते हजर असताना पंकजा मुंडे गायब असल्याने अनेकांनी तर्क-वितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
अमित शहा यांनी काल लालबाग राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबईत भाजप खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत. जनता एनडीएसोबत आहे. मला विश्वास आहे की आगामी बीएमसी निवडणुकीत एनडीए प्रचंड बहुमताने विजयी होईल असं यावेळी अमित शहा यांनी सांगितलं. त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 150 नगरसेवकांचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले.
“तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असताना भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेत मुंबईत महापालिका निवडणुकांसाठी रणनिती ठरवत होते. तेव्हा पंकजा मुंडे परळीमध्ये होत्या. गौरी गणपती स्पर्धेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी परळी शहरातील घरोघरी जाऊन गौरी गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत का ? असा देखील सवाल कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पडला आहे.
Read also
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”