औरंगाबाद : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात आमदार प्रशांत बंब यांनी काही शाळांना भेटी दिल्या होत्य़ा. या वेळी आमदार प्रशांत बंब यांनी चक्क दुपारच्या वेळी मुलांना जी खिचडी दिली जाते त्या खिचडीचा आस्वाद घेतला. शाळेतील एका छोट्या बाकावर बसत त्यांनी शाळेतील प्लेटमध्ये खिचडी घेत त्या खिचडीची गुणवत्ता कशी आहे याची तपासणी केली.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
खिचडी अगदी चांगली आहे. सकाळी मी आलो तेव्हापासुन याची तयारी सुरू होती. डाळ, बटाटा, भोपळा आणि भातही चांगला होता. मी आलो आहे म्हणुन चांगली केली असं काही नाही. प्रत्येक गोष्टीकडे आपण शंकेच्या नजरेतुन नाही बघू शकत. सर्व तोच माल आहे. आणि मी मुलांना पण विचारलं तर त्या वार नुसार भेटल्याचं मला जाणवलं, असं आमदार बंब म्हणाले आहेत.
“तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्तेची चाचणी घेतली. त्यानेतर त्यांनी 80 ते 90 टक्के शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचा आरोप केला आहे. वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थांना धडे घेतले, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न सुद्धा माहित नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अ आ इ ई सुद्धा येत नव्हते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्ण उजळणी म्हणता येत नव्हती, असही बंब म्हणाले आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षणाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. बहुतांश शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, त्यामुळे अनेक पिढ्य़ांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे.
Read also
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं