मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला, जनमताचा अपमान केला. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपने विस्तार केला आहे. तसेच भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका, जे धोका देतात, त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लोबोल केला. त्यावर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. या बैठकीत पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद एका पक्षाला आणि दुसरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला मिळणार असे ठरले होते. असे असल्यानंतर जर आता अमित शहा हे उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब आहे. हे आम्ही सहन करणार नाही. अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असे खोटे बोलणे साफ चुकीचे आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
अमित शहा काल मुंबईच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपच्या कोअर कमिठीची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत 135 नाहीतर मला 150 नगरसेवक निवडणुन आणा असं आव्हान त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काल विविध ठिकाणी भेटी देऊन गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेतलं.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीचा मुद्दा काल अमित शहा यांनी पुन्हा चर्चेला आणला. त्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चांवर आलं आहे. यावरून विरोधक आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे.
Read also
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा