पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. 2024 ची लोकसभेची निवडणुक भाजप एकहाती जिंकेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप 400 जागा जिंकेल असा दावा त्यांनी बारामती याठिकाणी केला आहे. तसेच बारामतीचा गड उद्धवस्त करू असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीकडून खरपुस समाचार घेण्यात आला आहे.
“अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राजकारणाने नाही तर समाजकारणाने बांधलेला आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा परिचय एक समाजकारणी म्हणून जास्त आहे. राजकारण करण्याची भूमिका भाजपची आहे. समाजकारणाचे बाळकडू खासदार सुप्रियाताई सुळे यांना लहानपणापासून स्व. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेबांच्या प्रेरणेतून मिळाले आहे याची आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे नव्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याने त्यांना कार्यकर्त्यांसमोर बोलावं लागतं. तसेच मीडियासमोर बोललं तर बातमी होते परंतु संपूर्ण महाराष्ट्राला खासदार सुप्रियाताई सुळे यांचे काम कसे आहे याचा परिचय असल्याचे महेश तपासे म्हणाले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक भाजप खासदार आहेत.
“अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
शिवाय सलग सातवेळा संसदरत्न, त्यानंतर त्यांनी १५वी, १६वी, १७वी लोकसभा अशा सलग तीन लोकसभा जनतेतून निवडून आलेल्या आहेत. १६ व्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करण्यात आला आहे आणि तेही मोदी राजवटीत, अशी आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली.
“मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सितारामन या बारामती लोकसभेच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याचबरोबर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील बारामती लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत. ते असं म्हणतात की, बारामती लोकसभेचा गड आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना साधं विधानसभेच तिकीट मिळालं नाही, जनतेतून निवडून येऊ शकले नाही. आज त्यांना विधान परिषदेवर घ्यावं लागतं ते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करतात. ज्या निर्मला सितारामन देशाच्या अर्थमंत्री आहेत त्या २०१४ पासून राज्यसभेचं नेतृत्व करतायेत त्या निर्मला सितारामन लोकसभेच्या संसद महारत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करतात.
Read also
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”