पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा बारामती मतदार संघ सध्या राज्याच्या राजकारणाचा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक शतके राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या बारामतीवर वचर्स्व मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण देखील बारामती दौऱ्यावर येणार असून त्यांच्याच दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी ते आले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत. ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.
“राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 60 वर्ष प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारूती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होेत? बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही.. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी भेटी दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे मोठे गड उध्दवस्त केले तसेच बारामतीचा गड देखील येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उध्दवस्त करू असा दावा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार शाब्दिक टिका टिप्पणी केली जात आहे.
1990 नंतर शरद पवार साहेबांचे
नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
Read also
- “तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
- “माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
- “भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे