मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका वाढल्या आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आज देखील शिवसेनेच्या कार्यकत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहणं याला राहणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेंना राहा असा सुचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपंद जर मला पाहिजे असतं. तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे 30 ते 40 आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो. असंही देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बंरय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपुनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन असंही ते म्हणाले.
Read also
- “भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे