बारामती : श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल. लोकांनी खूप सहन केलं आहे. ते राष्ट्राध्यक्ष पळून गेले, तुम्ही तर साधे खासदार आहात, अशी घणाघाती टिका भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
“राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला? जेव्हापासून सितारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
“वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
बारामतीत परिवर्तन करायची वेळ आली आहे. बारामती हा बालेकिल्ला नसून, शरद पवारांची एक टेकडी आहे. दोन वर्ष मी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण पोलीस, प्रांत, तहसिलदार यांच्यावर चालते. माझ्यावर केसेस दाखल केल्या. समाजकारण, राजकारणात काम करताना केसेस दाखल होतात. केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. अजित पवारांनी बंड केलं, तेव्हा २ आमदार सुद्धा आमदार मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या मागे ५० आमदार राहिले, असा टोमणा पडळकर यांनी अजित पवारांना मारला आहे.
“स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
सोबतच, देशात अनेकजण निवडणुका 40-40 वर्षे जिंकेल. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार. आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल. असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर आम्हाला संघटन मजबुत करायचं आहे. विकासकामे पुढे न्यायाची आहेत. जनतेला आतापर्यंत जे मिळालं नाही ते त्यांच्यापर्यंत पोहाचवायचं आहे, असं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Read also
- “माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
- “भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?